मुंबई : महायुती सरकारचे पालकमंत्री अखेर जाहिर करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बीडचे दोन कॅबिनेट मंत्री असून ही, दोघा ही मुंडे बहिण – भावांना बीडचे पालकमंत्री होता आले नाही. पंकजाताई जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री जाहिर केले आहेत. स्वतः फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारून सुखद धक्का दिलाय.
पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. मंत्री धनंजय मुंडेंना वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. गेल्यावेळी मुंडे बीडचे पालकमंत्रिपद होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत. ना. राणे सिंधुदुर्ग चे पालकमंत्री असतील, असे जाहीर करण्यात आले आहे.