दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत सिद्ध करता येईल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल च्या एजन्सीकडून काढला गेल्याने, चर्चेला उधाण आले असून, अरविंद केजरीवाल यांची हॅट्ट्रिक होणार की सत्ता जाणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपाच्या जागा वाढतील, अशी चर्चा आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या जागा कमी होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे, अरविंद केजरीवाल यांच्या किती जागा कमी होतील आणि भाजपाच्या किती जागा वाढतील, यावर सगळे गणित अवलंबून आहे. केजरीवाल चौका मारतील की, भाजपाला मोका मिळेल ? यावर विविध क्षेत्रातील राजकीय तक्ष चर्चा करून, अंदाज बांधू लागले आहेत. काँग्रेसचा एक आमदार निवडून येईल, असा तर्क आहे. दिल्ली भाजपाला ताब्यात घेऊन 27 वर्षाचा इतिहास बदलायचा आहे. काय होईल, हे 8 फेब्रुवारी 2025 रोजी स्पष्ट होईल.
दरम्यान, विधानसभेसाठी दिल्लीमध्ये आज दि. 5 रोजी मतदान होत असून, दिल्ली कुणाची याचा फैसला मतदार राजा करणार आहे. दरम्यान, आप, काँग्रेस आणि भाजपाचे
भवितव्य पणाला लागले आहे. दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल (आप),मुख्यमंत्री आतिशी (आप), मनीष सिसोदिया (आप)
सत्येंद्र जैन (आप), अलका लांबा (काँग्रेस), संदीप दीक्षित (काँग्रेस), तसेच प्रवेश शर्मा, रमेश बिघुडी, अलका लांबा, संदीप दिक्षित [ भाजपा ]
यांच्या मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले आहे. १.५६ कोटी[ एकूण मतदार ] मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्या साठी १३ हजार ७६६ दिल्लीतील मतदान केंद्रे सज्ज आहेत. अरविंद केजरीवाल हॅट्ट्रिक साधणार की ,भाजपा बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकून विधानसभेवर कब्जा केला होता. त्यावेळी भाजपला अवघ्या ८ जागा जिंकता आल्या होत्या. काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी उद्या (ता.५) कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडत असून सुमारे कोट्यवधी मतदार सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दिल्लीत यावेळी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असली तरी, मुख्य मुकाबला ‘आप’ आणि ‘भाजप’मध्ये होणार आहे. सलग दोन निवडणुकांत आम पक्षाने सरकार बनविले होते. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि सरकारी-खासगी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. ५५ जागा जिंकत पुन्हा सत्ता काबीज करू असा विश्वास आप नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. यावेळी “आप” चे जहाज मतदार राजा यमुना नदीत बुडणार, असा दावा भाजपकडून करण्यात