गेवराई – बीड : – जगदगुरू संत तुकोबाराय यांचे पट्टशिष्य आणि तुकाराम गाथेचे लेखक संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . थोर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे लेखन व जतन करून जगाला तुकाराम गाथा उपलब्ध करून देणारे प्रबोधनकार संत संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन आणि कार्य सामान्य व्यक्ती व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे म्हणून येथील संत संताजी तिळवण तेली युवक मंडळाच्या वतीने जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त गटशिक्षण कार्यालयाच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
शाळेने आयोजकाकडे निबंध जमा करण्यास सांगितले होते . या स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळाला . प्राथमिक व माध्यमिक गटात ही स्पर्धा घेण्यात आली . परिक्षक म्हणून शिक्षक जालिंदर ठवरे, संतोष कोठेकर, प्रविण केमधरणे यांनी काम पाहिले . स्पर्धेचे नियोजन प्रसिद्ध वक्ते तथा संत साहित्याचे अभ्यासक धर्मराज करपे यांनी केले होते . या स्पर्धेचा निकाल संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी २८ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला .
निकाल प्राथमिक गट ( ५ वी ते ७ वी)
प्रथम क्रमांक – आयुष अर्जुन चव्हाण (सेंट झेवियर्स हायस्कूल, गेवराई),
द्वितीय क्रमांक – वेद प्रमोद आमलेकर (विमला माध्यमिक विद्यालय, गेवराई),
तृतीय क्रमांक – कु. अंकिता रामेश्वर कदम (जि.प.मा.शा. धोंडराई),
उत्तेजनार्थ
१) कु. निशा दिगांबर उमप (जि.प.प्रा.शा. अंतरवाली),
२) कु. तनुजा दादासाहेब घोडके (जि.प.प्रा.शा. गोळेगाव) तसेच
माध्यमिक गट ( ८ वी ते १० वी)
प्रथम क्रमांक – कु. राजनंदिनी बाजीराव धोत्रे (जि.प.मा.शा. उमापूर),
द्वितीय क्रमांक – कु. गौरी गणेश वावरे (जि.प.प्रा.शा. अंतरवाली),
तृतीय क्रमांक – कु. शेख महेक बब्बु (विमला माध्यमिक विद्यालय, गेवराई),
उत्तेजनार्थ
१) अली सुरज सय्यद (जि.प.मा.शा. धोंडराई),
२) कु. मोनिका महादेव गरड (जि.प.प्रा.शा. राजपिंपरी) यांनी स्पर्धेत क्रमांक पटकावला . संत जगनाडे महाराज यांचे कार्य घराघरात पोचावे या उद्देशाने आयोजित स्पर्धेत स्पर्धकांना संत संताजी जगनाडे महाराज यांचे साहित्य वाचावे लागले ही एक चांगली बाब आहे . स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दर्पण दिनी सोमवार दि .६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शास्त्री चौकाजवळ असलेल्या पत्रकार भवनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे . तरी या कार्यक्रमास विजेत्या स्पर्धकांसह पालक , मार्गदर्शक शिक्षक तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त तेली समाजाच्या वतीने आयोजक तथा अध्यक्ष प्रा .राजेंद्र बरकसे यांनी केले आहे .